डियर डियर सिस्टर,
खुशी,
तुझी 12th झाली, तू आता एडुकेशन साठी घरा बाहेर पडणार, कस राहायचं वगैरे वगैरे तुला सांगायची गरज नाही, तरीही तुला एक सांगायचं होत, तू फार लवकर कॉन्फयुज्ड होते, सरळ सरळ बोलायचं झाल तर, काही टेन्शन आलं की लगेच बावरते, काय करू, काय करू, कस करू, कस होईल... वगैरे वगैरे करते... म्हूणन एक सांगायचं होत की,
जगात तुझा आजूबाजूला जे पण काही आहे, जे तुझा सोई साठी आहे, वारंवार तुझा कामात येते, मग ते काहीही असो कोणी व्यक्ती असो, एखादी वस्तू असो... काहीही....... सर्व हॆ फक्त 'तू आहेस' म्हूणन तुझा आहेत..
त्या वस्तूंमुळे, व्यक्तीमुळे तू इथे नाहीस..... जर तू नसती तर काहीही नसत... म्हूणन 'स्वतःला' महत्व दे.. जगात तुझासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही, तुला वाट्टेल ते तू करू शकते कारण काय 'तू आहेस' म्हूणन...
तुझी इच्छा हा तुझा तुझ्यासाठी हुकूम आहे.. म्हूणन तुला वाट्टेल ते कर, वाट्टेल तसे कर.. स्वतःवर विश्वास ठेव.. स्वतःवर प्रेम कर.. स्वतःची काळजी घे.
तुला सर्व बाजूनी एक सीमा आहेत आणि त्याचा सेंटर तू आहेस ते तुझा आयुष्याच सर्कल आहे आणि फक्त तुझं आहे, त्यात कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही, हा तुझा स्वतंत्र निर्णय आहे, मान्य आहे कधी लोकांना ओळखायला चुकतो आणि चुकून ते आपल्या सीमेट शिरतात, कालांतराने ते आपल्या आवडली नाही किंवा नंतर तुला त्यांचा त्रास झाला तर त्यानां कायम चं बाहेर काढून दे, मग त्यानां काय वाटेल याचा विचार तू नको करू नकोस..
आणि जे तुझ्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर तुही जीवापाड प्रेम कर.. त्यांना तुझा आयुष्याचा शेवट च्या क्षणा पर्यन्त जप..
आणि कधी एकटं वाटलं, आपल कोणीच नाही, सर्व स्वार्थी आहेत, हॆ मी कोणाला सांगू, कोणाला बोलू, वगैरे वगैरे विचार आले तर तुला समजून घ्यायला नेहमी मी आहे आणि मी नसली जरी तरी तुझा साठी फक्त 'तू आहेस'
तुझी समी..
(मी मोठी असून पण तू ताई म्हणतं नाही 😒)



